Saturday, July 6, 2019
बोला काय प्रॉब्लेम आहे ?
Friday, December 1, 2017
तेच ते
तेच ते, तेच ते,
तेच ते आणि तेच ते...
तेच ते दगड, तीच ती माती,
त्याच त्या विटा आणि तीच ती रेती
तेच ते रडणे, तेच ते हसणे
तेच ते tv समोर तासनतास बसणे
त्याच त्या मालिका, तीच ती रडारड,
ACP प्रद्युमन च्या टीम ने केलेली
तीच ती धरपकड
तोच तो तळहात तेच ते चटके,
त्याच त्या लादिवर फिरणारे तेच ते कटके
तीच ती नोकरी, तीच ती ट्रेन,
त्याच त्या गर्दीत आऊट होणारे,
तेच ते ब्रेन,
तेच ते राजकारण, तेच ते आरोप,
तीच ती उदघाटने आणि तोच तो समारोप
तेच ते चॅटिंग, तेच ते प्रेम,
फक्त पहिल्याला सोडून
दुसऱ्यावर धरलेला नेम
आणि तेच ते आयुष्य....
तेच ते आयुष्य, तेच ते दिवस,
तोच तो प्रवास आणि तेच ते मृत्यूचे सावट
नाही राहिले आता फक्त
तेच ते माझे मन,
ते पेटलंय, जळलंय,
जळून खाक झालंय...
उरली आहे आता फक्त राख.
तीच ती राख
एका मेलेल्या माणसाची
जो कधी जिवंत होता
ती ही नष्टच होईल,
जेव्हा कोणाच्या तरी आपल्याच व्यक्तीच्या हातातून
त्या राखेचे पाण्यात विसर्जन होईल.
-
©सचिन सावंत
०१/१२/२०१७