Sunday, February 19, 2017

फेसबुकायन

सोशल नेटवर्किंग चे काही do's and don'ts आहेत. जे इथे वावरताना आपण पाळले पाहिजेत असा नियम नाही पण तो एक कॉमन सेन्स आहे.
आपण फेसबुक वर काय टाकायचं आणि काय नाही ही प्रत्येकाची तशी खाजगी बाब आहे. त्याबद्दल मी काय म्हणणार ? पण सोशल आणि त्यातल्या त्यात नेहेमी online राहण्याच्या नादात आपल्याला हे भानच राहत नाही की आपण नक्की काय शेयर करतोय ?
काही जण उत्साहाच्या भरात शेयर करतात, "Going to kashmir with Family for 10 days" आणि मग याचा अर्थ १० दिवस त्या घरात कोणीच नाही हे सुद्धा समजते. आणि मग चोऱ्या होतात. त्यामुळे जरा जपूनच स्टेटस टाकला तर आपलेच नुकसान वाचेल.
काही महाभाग तर त्यांची कुठलीही पोस्ट ५० एक जणांना TAG करतात आणि पोस्ट करतात. त्यांना माझे एवढेच सांगणे आहे कि बाबांनो, अशाने तुमच्या पोस्ट चे Likes वाढणार नाहीत. त्यासाठी ती पोस्ट पण चांगली पाहिजे ना. हल्ली देवांचे, बाबांचे फोटोज ५० आणि कधीकधी त्यापेक्षा जास्त जणांना TAG करून Good Morning wish करतात. पण त्यामुळे होतं काय कि ज्याला tag केलंय त्याच्या wall वर अशा पोस्ट चा धुमाकूळ होतो. आणि इच्छा नसताना मग बोलायचं कस या विचारातून तोंड दाबून बुक्क्यांचा मार सुरु होतो. म्हणजे सहन ही होत नाही आणि सांगता पण येत नाही, अशी अवस्था होते.
काही अति हुशार माणसं झाडून सर्व पोस्ट Like करत सुटतात. म्हणजे कुणालाच राग नको या निष्काम कर्मयोगाच्या भावनेतून. मग ती पोस्ट कशीही असो. चांगली असो अथवा वाईट. पण जर अशी सर्व पोस्ट like करणारी व्यक्ती एखादी मुलगी असेल तर मग बऱ्याच वेळा तिच्या नुसत्या साध्या like चा भलताच अर्थ काढला जातो. त्यामुळे खास करून मुलींनी कोणतीही पोस्ट like करताना अथवा कमेंट करताना सांभाळून केलं पाहिजे.
सतत DP बदलाने हे तर आता व्यसन झालेले आहे. पण त्या फोटोंचा सुद्धा गैरवापर होऊ शकतो !तेव्हा जर फोटो टाकायचाच असेल तर तो Low resolution चा टाकावा. त्यावर कॉपीराईट चा symbol असला तर well & good.
तसेच एखादी भडकाऊ पोस्ट टाकताना १० वेळा विचार करावा. की या पोस्ट मुळे पुढे काय होईल ?
त्तुर्तास इतकंच.
बाकी उरलेले नंतर कधीतरी.

-
©सचिन सावंत.

No comments:

Post a Comment