Wednesday, November 8, 2017

माणसाची मानसिकता

माणसाची मानसिकता हल्ली कशी आणि किती कमी कालावधीत बदलेल त्याचा अंदाज लावणे मुश्किल झालेले आहे, म्हणजे परवा परवा पर्यंत आपल्याला एखादी व्यक्ती जशी वाटत असते, त्या व्यक्तीचा स्वभाव जसा वाटत असतो, त्याच्या अगदी विरुद्ध वागणे असते त्या व्यक्तीचे, म्हणजे आपल्या कल्पनेच्या पलीकडचे सुद्धा असू शकते. दर्जा बाबत न बोललेलेच ठीक कारण व्यक्तिसापेक्ष हे सिद्धांत बदलत असतात. फक्त आपण विश्वास (खरं तर अंधविश्वास) ठेवलेल्या व्यक्तीने आपल्या कल्पने पलीकडे वागणे हा धक्का आपल्याला पचवता येणे अवघड असते. अशा वेळी मग आपण त्या व्यक्तीला ओळखण्यात चूक केली, असे म्हणावे लागते आणि आपल्या मनाला समजवावे लागते. पण इतका साधा सरळ विचार करून चालण्यासारखे असते का ? तर नाही. वागण्यातील बदल कोणत्या पातळीवरचा आहे यावर हे ठरते. मग ते "ठीक आहे" इथपासून ते "त्या व्यक्तीला संपवून टाकले पाहिजे" इथपर्यंत काहीही असू शकतो.
सर्वात मोठी शोकांतिका कधी असते? एखादी व्यक्ती आपल्याशी कायम खोटं बोलत राहिली आहे, कायम विश्वासघात करत राहिली आहे, ही जाणीव होणे. आणि मग स्वतः ला स्वतःवरच राग यायला लागतो. कारण माणूस ओळखण्यात चूक झालेली असते. अशा वेळी आपलीच कसोटी असते, ती म्हणजे आपण यातून किती लवकर सावरतो याची. किंबहुना सावरु शकतो की नाही याची.
-
© सचिन सावंत

No comments:

Post a Comment