Sunday, February 19, 2017

फेसबुकायन

सोशल नेटवर्किंग चे काही do's and don'ts आहेत. जे इथे वावरताना आपण पाळले पाहिजेत असा नियम नाही पण तो एक कॉमन सेन्स आहे.
आपण फेसबुक वर काय टाकायचं आणि काय नाही ही प्रत्येकाची तशी खाजगी बाब आहे. त्याबद्दल मी काय म्हणणार ? पण सोशल आणि त्यातल्या त्यात नेहेमी online राहण्याच्या नादात आपल्याला हे भानच राहत नाही की आपण नक्की काय शेयर करतोय ?
काही जण उत्साहाच्या भरात शेयर करतात, "Going to kashmir with Family for 10 days" आणि मग याचा अर्थ १० दिवस त्या घरात कोणीच नाही हे सुद्धा समजते. आणि मग चोऱ्या होतात. त्यामुळे जरा जपूनच स्टेटस टाकला तर आपलेच नुकसान वाचेल.
काही महाभाग तर त्यांची कुठलीही पोस्ट ५० एक जणांना TAG करतात आणि पोस्ट करतात. त्यांना माझे एवढेच सांगणे आहे कि बाबांनो, अशाने तुमच्या पोस्ट चे Likes वाढणार नाहीत. त्यासाठी ती पोस्ट पण चांगली पाहिजे ना. हल्ली देवांचे, बाबांचे फोटोज ५० आणि कधीकधी त्यापेक्षा जास्त जणांना TAG करून Good Morning wish करतात. पण त्यामुळे होतं काय कि ज्याला tag केलंय त्याच्या wall वर अशा पोस्ट चा धुमाकूळ होतो. आणि इच्छा नसताना मग बोलायचं कस या विचारातून तोंड दाबून बुक्क्यांचा मार सुरु होतो. म्हणजे सहन ही होत नाही आणि सांगता पण येत नाही, अशी अवस्था होते.
काही अति हुशार माणसं झाडून सर्व पोस्ट Like करत सुटतात. म्हणजे कुणालाच राग नको या निष्काम कर्मयोगाच्या भावनेतून. मग ती पोस्ट कशीही असो. चांगली असो अथवा वाईट. पण जर अशी सर्व पोस्ट like करणारी व्यक्ती एखादी मुलगी असेल तर मग बऱ्याच वेळा तिच्या नुसत्या साध्या like चा भलताच अर्थ काढला जातो. त्यामुळे खास करून मुलींनी कोणतीही पोस्ट like करताना अथवा कमेंट करताना सांभाळून केलं पाहिजे.
सतत DP बदलाने हे तर आता व्यसन झालेले आहे. पण त्या फोटोंचा सुद्धा गैरवापर होऊ शकतो !तेव्हा जर फोटो टाकायचाच असेल तर तो Low resolution चा टाकावा. त्यावर कॉपीराईट चा symbol असला तर well & good.
तसेच एखादी भडकाऊ पोस्ट टाकताना १० वेळा विचार करावा. की या पोस्ट मुळे पुढे काय होईल ?
त्तुर्तास इतकंच.
बाकी उरलेले नंतर कधीतरी.

-
©सचिन सावंत.

Friday, February 17, 2017

गाणं मनातलं


मा
झं आवडतं मराठी गाणं कुठलं असं जर विचारलं तर पटकन नाही सांगता येणार, बरीच आहेत, चांगली आहेत.
पण (हिंदी किंवा मराठी मधलं) असं कुठलं गाणं आहे की जे ऐकल्यावर मन प्रसन्न होतं, जीव आनंदी होतो, चेहेऱ्यावर एक हलकीशी Smile येते, असं जर कुणी मला विचारलं तर एकाच क्षणात मी सांगू शकतो,
 
फुलले रे क्षण माझे फुलले रे

या भावगीतात काय जादू आहे ते ज्याने हे गाणे ऐकलंय तोच सांगू शकेल.
एका नववधूच्या मनातल्या भावना या गीतात गीतकार नितीन आखवे यांनी छान साकार केल्यात
आणि त्यावर श्रीधर फडके यांचं संगीत आणि आशा भोसले यांचा स्वर असा काही जादू करतो की आपला चेहेरा आपसूकच खुलतो.
ज्यांनी अजून सुद्धा हे भावगीत ऐकलेलं नाही त्यांनी जरूर ऐका.
-
Sachin

Wednesday, February 15, 2017

तिने हो म्हटल्यावर

शब्द अपुरे पडतात
सुचत नाही काही
पण जीव भांड्यात पडतो......
तिने हो म्हटल्यावर

तगमग जीवाची
उदासी आयुष्यभराची
खळबळ मनाची
शांत होते........
तिने हो म्हटल्यावर

विसर पडतो सगळ्याचा
चिंता अन तणावाचा
भावगीत ऐकावे एखादे
वाटू लागते प्रकर्षाने.....
तिने हो म्हटल्यावर

जग सुंदर वाटू लागते
स्वतःच स्वतःला आवडू लागतो
मनातला संभ्रम दूर जातो....
तिने हो म्हटल्यावर

तीच आपल्यासाठी एक
बाकी काही नको
आता मरण आले तरी चालेल
वाटू लागते असे.....
तिने हो म्हटल्यावर

© सचिन सावंत

Saturday, February 4, 2017

मनातल्या भावना | एक गूढ कोडे

नातल्या भावनांचं खरं तर काही सांगताच येत नाही. कधी कधी एवढ्या #हायपर होतात तर कधी खूप शांत. एखादी गोष्ट आपण स्वतःच्या मनात किती काळ दडवून ठेवावी, आपल्या भावना किती काळ दाबून ठेवाव्यात याला सुद्धा काहीतरी मर्यादा असतीलच, मन हे काही शेवटी #यंत्र नाही ना, कारण कधीतरी हा #ज्वालामुखी उफाळून वर येतो, आणि मग त्याचे बरेच #चांगले #वाईट पडसाद उमटतात.
एखाद्यावर प्रेम जरी केले तरी ते त्या व्यक्तीला सांगावं की नाही हा बऱ्याचदा यक्ष प्रश्न असतो. त्या व्यक्तीला काय वाटेल? ती व्यक्ती आपल्याबद्दल काय विचार करेल? तिच्या मनातला आपल्याबद्दलचा #आदर तर कमी होणार नाही ना ? हा विचार यामागे असतो. बरीच वर्षे या भावना दाबून ठेवल्या जातात, आणि मग एखाद्या #नाजूक क्षणी मन #हळवे होते आणि नकळत आपण त्याच व्यक्तीला काहीतरी बोलून जातो आणि तिला दुखावतो. हेतू मात्र दुखावण्याचा नसला तरी ती व्यक्ती दुखावली जाऊ शकते हे मात्र खरं. ती व्यक्ती जर #समजूतदार असेल तर ती दुखावली गेली असली तरी सर्व विसरून आपल्याला #सांभाळून घेते. तिच्या चांगुलपणामुळे आपल्याला मग अपराधी वाटू लागते.
आणि मग सुरु होतो खेळ, आपल्या मनातलं त्या व्यक्तीला सांगावं कि सांगू नये या #द्विधा मन:स्थितीचा.
आणि मग आपण ती वेळ #टाळायचा प्रयत्न करू लागतो, पुढे ढकलण्याचा प्रयत्न करू लागतो, #योग्य #वेळ येण्याच्या #प्रतीक्षेच्या #भ्रमात.

(एका #अप्रकाशित पुस्तकातून साभार.........)