केलंय तिने बेदखल
तिच्या आयुष्यातून मला
कायमचं..
वाळले सगळे झरे,
आपुलकीचे, प्रेमाचे, हक्काचे, काळजीचे..
आता उरलं फक्त वाळवंटी प्रवास..
आणि उरला एक शोध
एका मृगजळाचा,
की ती माझ्या आयुष्यात
परतून येईल पुन्हा..
कारण ती म्हणाली होती मला,
मी कसं इग्नोर करेन माझ्या जीवाला...
आज तिचा हा जीव तीळ तीळ तुटतोय
तिला एकदाच भेटायला,
तिच्याशी बोलायला,
तिचा हसरा चेहेरा पाहायला,
तिचा तो चेहेरा ओंजळीत घ्यायला,
बाकी नको आता काही मला,
नाही का जाणवत माझी तळमळ जरासुद्धा तुला..
एक होता काळ असा,
व्हायच्या तासनतास गप्पा,
प्रेमाच्या गोष्टी,
आणि बरेच काही,
पुरत नसायचा वेळ दिवसा,
म्हणून रात्रभर व्हायचं बोलणं,
आता दिवस मोजणं सोडून दिलं मी,
आम्हाला शेवटचं बोलून
लोटलाय किती काळ ?
आठवते मला,
तिची प्रत्येक गोष्ट,
आणि
शेवटचा मेसेज तिचा,
आपण उद्या बोलूया....!
आपण उद्या बोलूया.... !
-
© सचिन सावंत
२९/१०/२०१७